बंद

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) हे जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या परिणामकारक नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीसाठी प्रमुख प्राधिकरण आहे. ह्याचे कार्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व निवासी जिल्हाधिकारी हे पदसिद्ध सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.

बातम्या आणि अध्यतने

जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती

तालुका नकाशा - गडचिरोली जिल्हा

भौगोलिक स्थान
उत्तर अक्षाांश १८.४३’ ते २१.५०’
पूर्व रेखांश ७९.४५’ ते ८०.५३’
क्षेत्रफळ १४,४१२ चौ.कि.मी.
उत्तरेस गोंदिया व भंडारा जिल्हा (महाराष्ट्र)
पूवेस राजनांदगांव, कांकेर, नारायणपूर, बिजापूर जिल्हा (छत्तीसगड)
दक्षिणेस आसिफाबाद (कुमरन भिम), मंचेरियल, जयशंकर भूपालपल्ली जिल्हा (तेलंगणा)
पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा (महाराष्ट्र)
पर्जन्यमान
सरासरी पर्जन्यमान १४३०.८ मि.मि (१४६७.४ मि.मि. (२०२३ साली))
आर्द्रता ६२%
प्रशासकीय रचना
स्थानिक स्वराज्य संस्था
प्रशासकीय विभाग नागपूर विभाग
विभाग ६- गडचिरोली, देसाईगंज/वडसा, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी
तालुके १२- गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, देसाईगंज/वडसा, कोरची, भामरागड, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली
शहरे
लोकवस्ती असणारे गावे १५०९
निर्जन गावे १६६
पंचायत समिती १२- गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, देसाईगंज/वडसा, कोरची, भामरागड, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली
नगर परिषद ३- गडचिरोली, देसाईगंज/वडसा, आरमोरी
नगर पंचायत ९- कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, कोरची, भामरागड, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली
ग्राम पंचायत ४५८
लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण लोकसंख्या १०,७२,९४२
पुरुष ५,४१,३२८ (५०.४%)
स्त्रिया ५,३१,६१४ (४९.६%)
ग्रामीण भाग ९,५४,९०९ (८९%)
शहरी भाग १,१८,०३३ (११%)
अनुसूचित जाती १,२०,७४५ (११.२५%)
अनुसूचित जमाती ४,१५,३०६ (३८.७०%)
लोकसंख्येची घनता ७४ प्रति चौरस कि.मी.
कुटुंब संख्या २,५०,४३५
(ग्रामीण- २,२२,४१३)
(शहरी- २८,०२२)
स्त्री- पुरुष प्रमाण ९८२/१०००
धर्मानुसार लोकसंख्या- हिंदू- ९,२७,४११
बौद्ध- ८२,६९५
ख्रिश्चन- ३,८७२
जैन- ४५४
मुस्लिम- २१,०६२
शीख- ६८१
इतर- ३०,०४७
अवर्गीकृत- ६,७१९
साक्षरतेचे प्रमाण
साक्षरता ७४.%
(८२.३% पुरुष)
(६६.३% स्त्रिया)
नद्या
प्रमुख नद्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी. इंद्रावती, दीना, गाढवी, खोब्रागडी, कोठारी, पामुलगौतम, पर्लकोटा, बांडिया
टेकड्या
प्रमुख टेकड्या भामरागड, टिपागड, पलसगड, सुरजागड
सर्वात उंच शिखर गडालगट्टा पहाड
बोली भाषा
बोली भाषा गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली, छत्तीसगडी
वनक्षेत्र
एकूण वनक्षेत्र १२,८९७,१२ चौ. कि.मी.
राखीव वनक्षेत्र ११,२२९.८७ चौ. कि.मी.
संरक्षित वनक्षेत्र १,४०३.०५ चौ. कि.मी.
अवर्गीकृत क्षेत्र २६४.२९ चौ. कि.मी.

आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनासंबंधी मूलभूत संकल्पना

  • विपत्ती (Hazard)-

    अत्यंत दुर्मिळपणे घडणारी किंवा अत्यंत टोकाची, नैसर्गिक अथवा मानवनिर्मित, अशी घटना की ज्यामुळे दुखापत होणे, मृत्यू ओढवणे तसेच मालमत्ता पर्यावरणाची हानी होऊ शकते.

  • असहायता (Vulnerability)-

    अशी प्राप्त परिस्थिती की ज्यामुळे लोकांची आपत्तीपूर्व तयारी करण्याची वा आपत्तीला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते. तसेच आपत्तीमुळे झालेली हानी सहन करण्याची वा नुकसान भरून काढण्याची क्षमता कमी होते.

  • क्षमता (Capacity)-

    आपत्तीशी सामना करण्यासाठी, सज्ज राहण्यासाठी, निवारणासाठी वा त्या परिस्थितीतून त्वरित बाहेर येण्यासाठी म्हणून उपलब्ध असलेली संसाधने, साधने व ताकद म्हणजे क्षमता होय.

  • जोखीम (Risk)-

    विशिष्ट कालावधी मध्ये प्रणाली, समाज किंवा समुदायामध्ये होऊ शकणारी जीवित हानी, इजा, मालमत्ता नष्ट किंवा खराब होण्याची संभाव्यता जी (Hazard), असहायता (Vulnerability), असुरक्षितता (Exposure) आणि क्षमता (Capacity) यांवरून निर्धारित केली जाते त्याला आपत्तीची जोखीम असे म्हणतात.

  • आपत्ती-

    नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे अथवा अपघातामुळे अथवा निष्काळजीपणामुळे उद्भवलेली कोणत्याही क्षेत्रातील मोठी दुर्घटना, संकट कि ज्या परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित हानी किंवा मानवी नुकसान किंवा मालमत्तेची हानी किंवा नाश किंवा पर्यावरणाची हानी किंवा ऱ्हास होतो आणि जिचे स्वरूप किंवा व्याप्ती त्या बाधित क्षेत्रातील लोकांच्या तोंड देण्याच्या क्षमतेबाहेर असेल तेव्हा त्याला आपत्ती असे म्हणतात.

  • आपत्तीमुळे प्रभावित परिसरातील जनजीवन, मालमत्तेची आणि पर्यावरणाची हानी होते. एकूण समाजव्यवस्था, संपर्क, दळणवळण कोलमडून पडते व स्थानिक जनता या परिस्थितीचा मुकाबला करण्यास असमर्थ असते.

  • आपत्ती व्यवस्थापन-

    आपत्ती व्यवस्थापन म्हणजे-

  • १) कोणत्याही आपत्तीचा धोका किंवा जोखीम यास प्रतिबंध घालणे.
    २) कोणत्याही आपत्तीची जोखीम किंवा तिची तीव्रता किंवा परिणामकता सौम्य किंवा कमी करणे.
    ३) क्षमता वाढ करणे.
    ४) कोणत्याही आपत्तीवर कार्यवाही करण्यासाठी सज्ज राहणे.
    ५) कोणत्याही इशारा प्राप्त आपत्तीच्या परिस्थितीबाबत किंवा आपत्तीबाबत तात्काळ कृती करण्यासाठी कार्यक्षम होणे
    ६) कोणत्याही आपत्तीच्या परिणामांची तीव्रता किंवा व्याप्ती निर्धारित करणे.
    ७) बचाव व मदत कार्य हाती घेणे.
    ८) पुनर्वसन व पुनर्रचना करणे
    यासाठी आवशयक असलेली नियोजन, संघटना, समन्वय, आणि अंमलबजावणी विषयक उपाययोजना याबाबतची अखंडित व एकात्मिकृत प्रक्रिया असा आहे.

  • आपत्तीची पूर्वतयारी (Disaster Preparedness) –

    यामध्ये आपत्ती संभाव्यता जोखण्याची, तिला प्रतिसाद देण्याची व मुकाबला करण्याची क्षमता वाढवण्याच्या हेतूने केलेल्या उपक्रमांचा समावेश होतो. एखादी घटना आपत्तीजन्य ठरू शकते असे अनुमान काढून त्यादृष्टीने लोकांना आपत्तकाळात आणि नंतर काय करावे यासाठीच्या उपाययोजनांचा समावेशही यामध्ये होतो.

  • आपत्ती सौम्यीकरण (Disaster Mitigation)-

    आपत्तीचा गाव, समाज आणि पर्यावरणावरील आघात आणि प्रभाव कमी करण्याच्या हेतूने आपत्तीच्या आधी केलेल्या उपाययोजनांचा या मध्ये समावेश होतो.

  • प्रतिबंधात्मक उपाययोजना (Disaster Prevention)-

    आपत्तीपासून कायमस्वरूपी संरक्षण देणे किंवा विपत्तीचे आपत्तीत रूपांतर होणार नाही यासाठी त्याची तीव्रता/ वारंवारिता कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा या मध्ये समावेश होतो.

  • प्रतिसाद (Relief and Response)-

    प्रतिसाद म्हणजे आपत्तीतून बचवलेल्या लोकांचा शोध घेणे, त्यांची सुटका करणे आणि त्यांच्या निवारा, पाणी, अन्न, आरोग्य सेवा इ. किमान गरजांची पूर्तता करणे.

  • पुनर्वसन (Rehabilitation)-

    आपत्तीनंतर पीडितांना त्यांच्या घरांची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी साठी केलेले साहाय्य, पडझड झालेल्या अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरु करणे, आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांचे पुनरुज्जीविकरण यासाठीचा केलेल्या कृती आणि कार्यक्रमांचा या मध्ये समावेश होतो.

  • पुर्ननिर्माण (Reconstruction)-

    यामध्ये पुनर्वसन आणि पुर्नबांधणी यांचा समावेश होतो. एखाद्या आपत्तीग्रस्त गावाने आपत्तीपूर्व स्थितीमध्ये आपले जनजीवन चालू करण्याची ही प्रकिया आहे.

  • आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster risk reduction)-

    आपत्ती जोखीम कमी करण्याचे उद्दिष्ट म्हणजे नवीन आपत्तींना होण्यापासून रोखणे, सध्या अस्तित्वात असणाऱ्या आपत्तींची जोखीम कमी करणे आणि आपत्ती जोखीम कमी करण्याचे उपाय करून देखील अस्तित्वात असणाऱ्या आपत्ती जोखीमांचे व्यवस्थापित करणे होय. हे सर्व Resilience मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी योगदान देतात.

केंद्र सूचित, राज्य सूचित आणि इतर आपत्ती

केंद्र सूचित, राज्य सूचित आणि इतर आपत्ती

गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या आपत्ती

गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या आपत्ती

हवामान अंदाज आणि पूर्व चेतावणी

  • हवामानाचा अंदाज आणि इशारे पाहण्यासाठी लिंक-
    प्रादेशिक हवामान केंद्र, भारतीय हवामान विभाग, नागपूर
  • हवामानाचा अंदाज आणि पूर्वचेतावणी साठी काही अँप्स-

  • 1 मेघदूत ऍग्रो ऍप/ Meghdoot Agro App-
  • For Android
  • For Iphone
  • 2 दामिनी ऍप/ Damini App-
  • For Android- https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini
    For Iphone- https://apps.apple.com/app/id1502385645
    3 सचेत/ SACHET ऍप-
    https://play.google.com/store/apps/details?id=com.cdotindia.capsachet&hl=en_IN
    4 भूकंप/ BhooKamp ऍप-
    https://play.google.com/store/apps/details?id=gov.in.seismo.riseq&hl=en_IN

सर्वसाधारणतः उष्ण लहरींच्या प्रभावादरम्यान-

काय करावे?

• हवामानाच्या योग्य आणि तात्काळ माहिती व बातम्यांसाठी रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या अलर्ट आणि सूचनांकडे बारकाईने लक्ष द्या.
• हवामानाशी संबंधित अँप जसे कि ‘सचेत’ डाउनलोड करू शकता.
• उन्हाळाच्या दिवसांमध्ये तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे.
• अपस्मार (Epilepsy) किंवा हृदय, मूत्रपिंड आणि यकृत संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी द्रव्य पदार्थांचे सेवन वाढविण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• उन्हाळाच्या दिवसांमध्ये हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावे.
• घराबाहेर उन्हात असताना डोक्यावर कापड, रुमाल, टोपी किंवा छत्री चा वापर करा.
• उन्हाळयात घातक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरू शकता.
• शक्य असल्यास डोळ्यांसाठी सनग्लासेस वापरा.
• उष्माघात झाल्यास काय केले पाहिजे यासंबंधीत प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्या.
• वृद्ध, मुले, आजारी किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्ती उष्माघाताला जास्त बळी पडण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.
• शक्य असल्यास दिवसाच्या अतिउष्म तासांमध्ये घरामध्येच रहा आणि कमीतकमी प्रवास करा.
• शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन), लस्सी, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी इ यांसारख्या घरगुती पेयांचे सेवन करू शकता.
• कांद्याची कोशिंबीर, कच्चा आंबा, मीठ आणि जिरे यांसारख्या पारंपारिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने उष्माघाताचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
• घर आणि कार्यालय परिसरात थंडावा आणि हवा खेळती राहण्यासाठी कूलर किंवा पंखे लावू शकता.
• उष्माघात टाळण्यासाठी वारंवार खूप थंड नसलेल्या साध्या पाण्याने आंघोळ करा.
• कार्यालय अथवा घरी येणारे विक्रेते, घरपोच वस्तू आणून देणाऱ्या लोकांना पाणी द्या.
• सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरा आणि शक्य असेल तेव्हा खाजगी वाहने देखील सामूहिकपणे वापरू शकता. यामुळे जागतिक स्तरावर तापमानवाढ आणि उष्णता कमी होण्यास मदत होऊ शकते.
• आपल्या आजूबाजूला उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करा. पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपायोजना करू शकतो.
• ऊर्जेची बचत करणारी कार्यक्षम उपकरणे, स्वच्छ इंधन आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करू शकतो.

काय करू नये?

• दुपारच्या वेळी बाहेर असताना अति मेहनतीचे काम करणे टाळा.
• विना चप्पल बूट घालता अनवाणी बाहेर जाऊ नका.
• घरात स्वयंपाक करताना दिवसाचे तापमान जेव्हा जास्त असते तेव्हा स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घरात हवा खेळती राहील यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. शक्य असल्यास उष्णता कमी करण्यासाठी एक्झॉस्ट पंखा बसवू शकतो.
• अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये यामुळे शरीरातून पाणी झपाट्याने कमी होते, त्यामुळे त्याचे सेवन टाळा.
• उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रथिने, खारट, मसालेदार आणि तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा तसेच शिळे अन्न खाऊ नका.
• लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना वाहनांमध्ये एकटे सोडू नका.
• अनावश्यक उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करणे टाळा.
• झाडांचा पालापाचोळा, भुसा, पीक काढल्या नंतरचे शिल्लक काड्या आणि कचरा जाळू नका.

सोशल मीडिया लिंक्स

आपत्कालीन संपर्क क्रमांक

  • पोलिस ११२
  • अग्निशामक विभाग १०१
  • रुग्णवाहिका १०८
  • जिल्हा नियंत्रण कक्ष ०७१३२-२२२०३१
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 15
  • 6
  • 7
  • 8
  • 9