प्रस्तावना:
मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्याच १०० दिवसाचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. त्यानंतर मा. मुख्यमंत्री यानी १५० दिवसाबा कृती आराखडा या विषयावर दि.०७ मे, २०२५ रोजी मंत्रालयीन अधिकारी व राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना हक्क परिषदेद्वारे (video conferencing), मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृह निर्माण यांच्या उपस्थितीत संबोधित केले आहे. यास अनुसरून शासकीय कार्यालयांमध्ये ई प्रशासन सुधारणा आणण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन परिपत्रक:
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी १५० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी आगामी १५० दिवसामध्ये त्यांचे कार्यालय ई प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करून कार्यालय नागरीकाना सोईचे कसे होईल यासाठी विशेष सुविधा पुरवणे अपेक्षीत आहे. याबाबतचा कृति आराखडा पुढील प्रमाणे निधीत करण्यात येत आहे.
उद्दिष्टे-
- Vertical पातळीवर कार्यक्षमता आणणे, (तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत अखंड जोडणी)
- Horizontal पातळीवर कार्यक्षमता आणणे. (प्रत्येक विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये समान मानक प्रक्रिया)